बंद

    अमृत २.० अभियान

    • तारीख : 14/07/2022 -

    केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानाची दिनांक १४ जुलै, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियान राज्यातील सर्व नागरी स्थानिक संस्थांमध्ये सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे. शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण करून स्वच्छ व शाश्वत पाणीपुरवठा करणे, जलस्त्रोत पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरित क्षेत्र विकसित करणे आणि ४४ अमृत १.० शहरांमध्ये १०० टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

    सदर अभियानांतर्गत राज्याच्या रु २८९२७ कोटी प्रकल्प किंमतीच्या राज्य जलकृती आराखडयास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर अभियानंतर्गत आजमितीस रुपये १९६०७ कोटी किंमतीच्या पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, सरोवर पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकास अशा एकूण १८८ प्रकल्पांना मार्च, २०२४ अखेर प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे.

    लाभार्थी:

    सर्व नगरी स्थानिक संस्था आहेत

    फायदे:

    यामध्ये १००% पाणी पुरवठा जोडणी, जलस्त्रोत पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकसित करणे, आणि मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी ह्याचा समावेश आहे. एकूण ₹२८,९२७ कोटी प्रकल्प खर्चाचा खर्च आहे

    अर्ज कसा करावा

    वरील माहिती पहा